वर्धा, 8 फेब्रुवारी : अहिराणी भाषेची आपली एक ओळख आहे. तसेच खान्देश व्यक्तिरिक्त अनेक अहिराणी भाषेला मानणाराही मोठा वर्ग आहे. त्यामुळे अहिराणी गाणीसुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणात सर्वत्र गाजत आहेत. एकंदरितच खान्देशातील अहिराणी भाषेची गोडी खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक भागात पाहायला मिळते.
यातच आता खान्देशातील सुप्रसिद्ध अहिराणी कवी गझलकार शरद धनगर यांनी म्हटलेल्या एका कवितेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कवी शरद धनगर यांनी एका कवितेचा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला. यानंतर त्यांनी म्हटलेल्या अहिराणी भाषेतील या कवितेला उपस्थितांनी खूप दाद दिली. तसेच या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाले आहे. तसेच अनेकांनी यावर वाह, खूप सुंदर, जबरदस्त अशा अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
5 फेब्रुवारीला वर्धा रेल्वे स्टेशनवर गाडी लेट असल्याने कवी शरद धनगर यांना काही सहप्रवाशांनी कविता म्हणण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी या लोकांच्या विनंतीवरून एक अहिराणी कविता म्हटली. यातले बहुतेक लोक हे अहिराणी भाषिक नव्हते पण त्यांना ही कविता समजली. त्यांनी या दिलखुलास दाद दिली. माझी अहिराणी भाषा त्यांच्यापर्यंत पोचवता आली हा सर्वात जास्त आनंद आहे. भाषा सगळ्या भिंती, बंधने कुंपणे झुगारून माणसं जोडते हेच खरे, मग ती भाषा कोणतीही असो, असे कवी शरद धनगर यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
कवी शरद धनगर यांच्या या कवितेला उपस्थितांनी खूप दाद दिली. तसेच या व्हिडिओला अनेक लाईक्स मिळाले आहे. तसेच अनेकांनी यावर वाह, खूप सुंदर, जबरदस्त अशा अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.