मुंबई, 14 फेब्रुवारी : आम्ही कल्याकारी मंडळ निर्माण केलं असून या मंडळाच्या माध्यमातून जे आदर्श रिक्षा चालक आहेत. आम्ही त्यांना पुरस्कार देणार असून पाच वर्षांपूर्वीची नोंदणी असलेले 65 वर्षांच्या वरिल जे काही रिक्षा चालक आहेत, त्यांना आम्ही प्रत्येकी 10 हजार रुपयांचं अनुदान देणार आहोत, अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलीय.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा नेमकी काय? –
मुंबईत पार पडलेल्या आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, आमच्या डिपार्टमेंटने माहिती काढली आहे. आजच्या घडीला राज्याभरात 14 हजार 387 रिक्षालाचक हे 65 वर्षांवरील आहेत. त्यांना यावर्षी आम्ही 10 हजारांची रक्कम देणार आहोत. दरम्यान, हे 10 हजार रुपये अनुदान/पुरस्कार म्हणून आम्ही एकदाच देणार आहोत, असेही प्रताप सरनाईक यांनी स्पष्ठ केलंय.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावाने मंडळ स्थापन –
प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या दिघे साहेबांच्या नावाने मंडळ स्थापन केले. आम्ही आता निर्णय घेतलाय की, 27 जानेवारी हा या महामंडळाचा वर्धापन दिन असेल आणि 50 कोटी रुपयांची तरतूद या महामंडळासाठी करण्यात आलेली आहे. ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ’, असे त्याचे नाव असणार आहे. आम्ही लोगोचं प्रकाशन सुद्धा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मार्च महिन्यात करणार आहोत. बोगस रिक्षा चालकांना कठोर कारवाई –
रिक्षा चालकांसाठी असलेल्या या कल्याणकारी महामंडळाचा राज्यातील एक लाखांपेक्षा अधिक रिक्षा चालकांना याचा फायदा होईल. त्यांच्यासाठी वेगळी बँक निर्माण करण्याचा मानस असून याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. याचा प्रत्येक जिल्ह्यात फायदा होईल. मंडळाचे 500 रुपये भरून सभासद सदस्य होण्यासाठी भरावे लागणार असून वर्षाला 300 रुपये फी देखील द्यावी लागेल. दरम्यान, बोगस रिक्षा चालकांना कठोर कारवाई केली जाईल. सर्वांनी नोंदणी केली तर 67 कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे येतील, असेही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.
हेही पाहा : IPS Dr. Maheshwar Reddy: सोशल मीडिया, क्राइम, तरुणाई; Jalgaon SP डॉ. महेश्वर रेड्डींची विशेष मुलाखत