जळगाव, 5 मार्च : राष्ट्रीय महामार्गावरील 18 किमीचा बायपास आहे. दरम्यान, तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे काम पुर्णत्वास आल्यानंतर हा बायपास विकासासाठी केंद्रबिंदू ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग (नवीन क्रमांक 53) तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे ग्रेडर बसविण्यात येत असलेल्या कामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद काय म्हणाले? –
जळगाव शहराच्या बाहेरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग (नवीन क्रमांक 53 ) तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे ग्रेडर बसविण्याचे काम सुरू आहे. या कामाची पाहणी आज जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, तरसोद येथील रेल्वे मार्गावरील पुलाचे सर्वात मोठे 56 फुटाचे ग्रेडर बसविण्याचे काम केले जात आहे. यासाठी 165 टनाच्या क्रेनच्या माध्यमातून हे ग्रेडर बसविण्याचे काम करण्यात येत आहे.भुसावळ रेल्वे विभागांतर्गत 10 जिल्हे येतात आणि पहिल्यांदाच या विभागात अशापद्धतीचे ग्रेडर बसविण्याचे काम केले जात आहे. रेल्वे मार्गावरील पुलाचे ग्रेडर बसविण्याचे काम अत्यंत जबाबदारीचे असते. यावेळी वेळेत काम पुर्ण करणे आणि स्वतःची सुरक्षितता देखील महत्वाची असते. या कामासाठी दीड तासांचा वेळ देण्यात आली होती. हे काम करत असताना जवळपास सात ट्रेन उशिरा करण्यात आल्या आणि ते काम वेळेत अचुकतेने पूर्ण करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रेल्वेच्या पुल पुर्णत्वास आल्यानंतर शहराचे विस्तारीकरण होईल. शहराच्या विकासाला वेग येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेली सर्व कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असल्याचीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी व्यक्त केला. जळगाव जिल्ह्याचा विकास व्हावा आणि जिल्ह्यातील नागरिकांच्या रस्त्यांच्या सेवा मिळाव्यात यासाठी देखील जिल्हा प्रशानाकडून प्रयत्न केले जात आहेत, असेही जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले.
जिल्हाधिकाऱ्यांचे युवकांना आवाहन –
आपण सर्वांनी हाय व्हॅल्यू स्किल शिकण्यासाठी स्वतःच प्रशिक्षण घेतले पाहिजे. या गोष्टींसाठी प्रशिक्षण घेतल्यास मोठ्या-मोठ्या प्रकाल्पात क्रेन ऑपरेटर, पोर्टमध्ये कामांच्या संधी प्राप्त होऊ शकतात. कामागारांसाठी देखील विशेष प्रशिक्षण असते. यामुळे अशापद्धतीचे प्रशिक्षण घेतल्यास रोजगाराचा लाभ मिळू शकतो. अकुशल कामगारपेक्षा कौशल्य आधारित कामगार होण्यासाठी युवकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी युवकांनी केले.