• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मित्राला वाचवायला गेले, तिघांचा नदीत बुडून मृत्यू, दुर्दैवी घटना

बुडणारा तरुण वाचला

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 15, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Three people drowned in river to save friend, tragic incident

मित्राला वाचवायला गेले, तिघांचा नदीत बुडून मृत्यू, दुर्दैवी घटना

पुणे : काल सर्वत्र धुलिवंदन साजरा होत असताना एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्राला वाचवण्याकरिता गेलेल्या तिघांचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. धुळवड साजरी करण्यासाठी नदीवर गेलेल्या मित्रांपैकी एक मित्र बुडू लागला. त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

काय आहे संपूर्ण घटना –

देहूरोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील देहूरोड किन्हईजवळ इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. राज दिलीप अघमे (वय 25, रा. घरकुल, चिखली), आकाश विठ्ठल गोरडे (वय 24, रा. घरकुल, चिखली) आणि गौतम कांबळे (वय 24, लोकमान्य हॉस्पिटल) अशी मृतांची नावे आहेत.

इंद्रायणी नदीवरील बोडकेवाडी बंधाऱ्यात जलउपसा केंद्राजवळ 6 तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. त्यापैकी एक तरुण बुडायला लागला हे पाहून त्याला वाचवायला त्याचे मित्र गेले. यावेळी बुडणारा तरुण वाचला. मात्र, त्याचे तीन मित्र पाण्यात बुडाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ, एनडीआरएफ, पीएमआरडीए, अग्निशमन दल यांची बचाव पथकं घटनास्थळी रवाना झाली होती.

यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या टीमने इंद्रायणी नदीपात्रात शोधकार्य राबवले आणि तिघांना संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास बाहेर काढले. त्यानंतर तत्काळ त्यांना यशवंतराव चव्हाण रुग्णालय पिंपरी याठिकाणी नेण्यात आले असता तिथे तपास करुन सदर डॉक्टरांनी पावणे सात वाजेच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी देहूरोड पोलीस स्टेशन येथे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, तिघांच्या मृत्यूच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – ahirani sahitya sammelan : खान्देशातील अमळनेर येथे राज्यस्तरीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आयोजन, असे आहे नियोजन

बातमी शेअर करा !
Share
Tags: deathindrayani rivermavalpune

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page