जळगाव, 18 एप्रिल : जळगाव जिल्ह्यात 32 रिक्त महसूल मंडळता नव्या आधार किटचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, आधार संच वाटपाची ही प्रक्रिया सुरळीत व्हावी तसेच उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र धारकांनाच आधार संच मिळावे, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपाययोजना केली आहे.
यानुसार, प्राप्त अर्जधारक केंद्रांची प्रांताधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती अर्जाची तर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती सेवा केंद्रांवरच्या सुविधांची चौकशी करत आहे. दरम्यान, येत्या 25 एप्रिलपर्यंत ही समिती चौकशी पुर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
त्यानंतरच पात्र अर्जधारकांना आधार किटचे वाटप केले जाणार –
आधार संच वाटपाची प्रक्रिया सुरळीत व्हावी व उत्कृष्ट सेवा देणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र धारकांनाच आधार संच मिळावे, त्यासाठी प्राप्त अर्जाची छाननी प्रकियेस सुरूवात झालीय. यासोबतच स्थानिक चौकशीदेखील होत आहे. दरम्यान, यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दोन समित्या नियुक्त केल्या आहेत.
त्यानुसार प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती अर्जाची पडताळणी तर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती सेवा केंद्रांमधील सुविधांची तपासणी करत असून ही प्रक्रिया २५ एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. ही संपुर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतरच पात्र अर्जधारकांना आधार किटचे वाटप केले जाणार आहे.
हेही वाचा : “एन्काऊंटरची चर्चा बंद दाराआड…10 लाख रूपये मला पाठवले”, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेंच्या आरोपांनी खळबळ