सर्व सामान्य नागरिकांना प्रशासनाच्या कारभारची ओळख व्हावी तसेच प्रशासकीय सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांबाबत माहिती व्हावी, यासाठी सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजच्यावतीने प्रेक्षकांसाठी “ओळख प्रशासनाची” ही विशेष मालिका सुरू करण्यात आली आहे. या मालिकेत ग्रामपंचायत विभागाची माहिती सर्वसामान्यांना व्हावी तसेच संबंधित अधिकारी यांचा प्रशासकीय सेवेतील प्रवास जाणून घेण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब शिवाजी अकलाडे यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांचा प्रशासकीय सेवेतील आतापर्यंतचा प्रवास तसेच त्यांना काम करताना आलेले अनुभव आणि ग्रामपंचायत विभागात कशापद्धतीने कामकाज चालतं, याबाबत सविस्तर माहिती दिलीय.