चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
पाचोरा, 8 एप्रिल : भारतीय जवान हे आपल्या जीवाची पर्वा न करता सीमारेषेवर देशाचे संरक्षण करतात. अशाच प्रकारे देशसेवेचे व्रत घेतलेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवानावर लग्न झाल्यानंतरच्या तीन दिवसांच्या कालवधीतच नववधूसह कुटुंबियांपासून दूर जात देशसेवासाठी सीमेवर जाण्याची वेळ आलीय. मनोज ज्ञानेश्वर पाटील (रा. खेडगाव नंदीचे ता. पाचोरा) असं या जवानाचे नाव असून हळदीचा रंग अंगावर असतानाच सैन्य दलाने आदेश दिल्यानंतर त्याने देशाच्या सेवेसाठी जाण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.
खान्देश सुपुत्र पाचोऱ्याहून देशसेवेसाठी रवाना –
पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे येथील भारतीय सैन दलात कार्यरत असलेला मनोज ज्ञानेश्वर पाटील या जवानाचा नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी 5 मे रोजी मोठ्या उत्साहात विवाह पार पडला. दरम्यान, घरात लगीनघाई संपत नाही तितक्याच मनोजला भारतीय सैन्य दलाकडून बोलवणं आलं. भारत-पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याची लष्काराकडून सुट्टी रद्द झाली. यामुळे, लग्नाला अवघे तीन दिवस उलटले असतानाच नववूध तसेच कटुंबियांना जड अंतकरणाने निरोप देत जवान मनोज पाटील हा आज पाचोरा येथून रेल्वेने सीमेवर देशसेवेसाठी रवाना झालाय.
पतीचा खूप अभिमान –
दरम्यान, धाडसी पतीला निरोप देताना नववधू यामिनी म्हणाल्या की, आमच्या घरी आज सत्यनारायणाची पूजा होती. तरी देखील माझे पती सीमेवर जात आहेत. यामुळे मला माझ्या पतीचा खूप अभिमान आहे. तसेच भारतीय सैन्याने निर्देश दिल्यानंतर माझ्या मुलाने धाडस दाखवत तो देशाच्या सेवेसाठी जातोय, याचा मला खूप अभिमान असल्याचे मनोजचे वडील ज्ञानेश्वर पाटील म्हणाले.
View this post on Instagram
अनेक जवानांना सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश? –
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 28 निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला होता. पहलगाम दहशतवादी हल्लाच्या प्रत्युत्तरात भारताने पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली. यावरून पाकिस्तान चांगलाच हादरलाय. असे असताना पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थीत निर्माण झालीय. त्यामुळे लष्करातील अनेक जवानांना सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आल्याचे समजते.