मुंबई, 4 मार्च: गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचे परिणाम आता इतर देशांवरही जाणवू लागले आहेत. या अचानक निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर अस्वस्थता वाढली असून, आखाती देशांमध्येही तणावाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक नागरिक दुबई विमानतळावर अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. काही प्रवासी काल रात्री सुरक्षितपणे भारतात परतले असले, तरी अजूनही अनेक जण दुबईसह इतर आखाती देशांत अडकलेले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने मोठी पावले उचलील
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून विविध यंत्रणांशी सातत्याने संपर्क साधत आहेत. केंद्र सरकारशीही समन्वय राखून अडकलेल्या नागरिकांना लवकरात लवकर परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे या संपूर्ण समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती –
मुख्यमंत्री कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (माजी ट्विटर) वर पोस्ट करत सांगितले की, आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सतत संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री स्वतः संबंधित यंत्रणांशी आणि केंद्र सरकारशी सातत्याने संवाद साधत आहेत.
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री…
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 2, 2026
मदतीसाठी विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक –
दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या समन्वयाने महाराष्ट्र सरकारने मदतीसाठी विशेष व्हॉट्सअॅप क्रमांक जारी केला आहे. अडचणीत असलेल्या किंवा तातडीच्या मदतीची गरज असलेल्या नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
व्हॉट्सअॅप क्रमांक : +97150 365 4357
दरम्यान, युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय सुरू असून, अडकलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती






