सांगली, 29 मे : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना असताना सांगली जिल्ह्यातून अपघाताची भीषण दुर्घटना समोर आली आहे. मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन गेलेले कुटुंब घरी परत येत असताना कार कालव्यात कोसळल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन आटोपून घरी परत येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. सांगलीच्या तासगाव – मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात कोसळली. दरम्यान, या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जण ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्री एक ते दीडच्या सुमारास घडला. राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय 60), सुजाता राजेंद्र पाटील (वय 55), प्रियांका अवधूत खराडे (वय 30), ध्रुवा (वय 3), कार्तिकी (वय 1) आणि राजवी (वय 2) यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नाली विकास भोसले (वय 30) या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
वाढदिवस साजरा झाला अन् परतीच्या प्रवासात अपघात –
अपघात मृत पावलेले कुटुंब तासगाव येथील रहिवासी होते. मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाटील-भोसले कुटुंबीय हे तासगाववरून वाढदिवसासाठी कवठेमहांकाळ येथील कोकळे गावात गेले असताना तेथून परत येत असतांना हा अपघात झाला. सांगलीच्या तासगाव – मणेराजुरी मार्गावर झालेल्या अपघातात कार ही थेट तासारी कॅनॉलमध्ये जाऊन कोसळली. दरम्यान, या कालव्यात पाणी नसल्यामुळे कालवा हा कोरडा होता. त्यामुळे वेगात असलेली कार ही कालव्यात आदळली. दरम्यान, यात सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपासास सुरूवात केलीय.
हेही वाचा : रामदेववाडी अपघात प्रकरण : ‘त्या कारमध्ये आरोपींसोबत एक मुलगीही होती’; एकनाथ खडसेंचा मोठा गौफ्यस्फोट