• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

माहितीचा अधिकार अर्जाद्वारे  माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज परिपूर्ण भरणे आवश्यक – राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या विषयावरील चर्चासत्र संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 9, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
माहितीचा अधिकार अर्जाद्वारे  माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी अर्ज परिपूर्ण भरणे आवश्यक – राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव

जळगाव, 9 ऑक्टोबर : माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत कोणत्याही कार्यालयाकडून माहिती मागवीत असताना, आपल्याला ज्या विषयाची माहिती आवश्यक आहे तो विषय अर्जात व्यवस्थितपणे लिहिणे,  विषयानुसार कोणत्या कालावधीतील माहिती पाहिजे आहे. आदी बाबींचा अर्जात उल्लेख करून जन माहिती अधिकारी यांच्याकडे अर्ज परिपूर्ण भरून सादर करणे आवश्यक असते. अशी माहिती, राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त भूपेंद्र गुरव यांनी दिली.

‘माहिती अधिकार कायदा 2005’ या विषयावर  जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना गुरव बोलत होते. यावेळी राज्य माहिती आयोग नाशिक खंडपीठाचे उपसचिव चंद्रकांत कातकाडे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आर. एस. लोखंडे, उपजिल्हाधिकारी निवडणुक अर्चना मोरे, भुसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते.

राज्य माहिती आयुक्त गुरव पुढे म्हणाले की, माहितीचा अधिकार कायदा अंमलात येऊन वीस वर्षे पूर्ण होत आहे. माहितीचा अधिकार हा कायद्याने नियंत्रित केलेला असून भारताच्या प्रत्येक नागरिकाला माहिती मागण्याचा अधिकार उपलब्ध आहे. कोणत्याही पदावर असलेल्या व्यक्तीला माहिती मागता येत नसून फक्त व्यक्ती म्हणून माहिती मागता येते. कलम सहा अन्वये माहिती मागताना फक्त विनंती करता येते.


माहिती अधिकाराचा अर्ज करताना, नमुना अर्जातील सर्व मुद्द्यांची माहिती अर्जदार भरणे आवश्यक असून अर्जाच्या बंद लिफाफ्यावर माहितीचा अधिकार अर्ज असे नमूद केले गेले पाहिजे. तसेच जन माहिती अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज पोहोचला आहे का याची खात्री अर्जदाराने करणे आवश्यक आहे.

प्रथम अपील अर्ज करताना, अर्जामध्ये माहितीचे कारण लिहिणे आवश्यक आहे. प्रपत्र ‘क’ नुसार आयोगाकडे द्वितीय अपील करतांना काय काळजी  घेतली पाहिजे, जनमाहिती अधिकारी आणि प्रथम अपीलीय अधिकारी यांनी माहिती अधिकार अर्ज हाताळतांना काय काळजी घ्यावी, अर्ज कसा करावा याबाबत त्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. माहितीचा अधिकार कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी जनमाहिती अधिकारी व प्रथम अपीलिय अधिकारी यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी गुरव यांनी माहिती अधिकारासंबधी माहिती अधिकाराचा अर्ज करतांना काय काळजी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले. चर्चासत्राच्या शेवटी जनमाहिती अधिकारी व माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या विविध प्रश्नाचे निरसण त्यांनी केले. या चर्चासत्राला शासनाच्या विविध विभागाचे जनमाहिती अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारी, माहिती अधिकार कार्यकर्ते,  समान्य नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी भुसंपादन अधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.

हेही वाचा : Breaking! जळगाव जिल्हाधिकारी पदाचा रोहन घुगे यांनी स्वीकारला पदभार

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsRight to Information Act 2005State Information Commissioner Bhupendra Guravsuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page