जळगाव : गेल्या काही दिवसात अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यातच चाळीसगावमध्ये एका तलाठ्याच्या पत्नीने 9 मार्च रोजी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर याप्रकरणी जिल्हाधिऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
नेमकं काय घडलं होतं –
राहुल कचरू आल्हाट असे मृत महिलेच्या पतीचे नाव आहे. तो महसूल विभागात तलाठी म्हणून कार्यरत आहे. विवाहित असलेला राहुल हा 2023 मध्ये तलाठी म्हणून रुजू झाला. तर निकिता जाधव ही 2024 मध्ये तलाठी म्हणून रूजू झाली. तलाठी राहुल हा विवाहित असूनही तलाठी निकिता जाधव आणि त्याचे प्रेमसंबंध जुळले. दोघांचे सूत जुळल्यानंतर त्यांनी राहुलची पत्नी पूजाला विभक्त करण्यासाठी छळायला सुरुवात केली होती. यामध्ये पतीसह सासरच्या मंडळींकडून वारंवार मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात आला. त्यामुळे या सर्व प्रकाराला कंटाळून राहुल याच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
राहुल आल्हाट व निकिता जाधव हे दोन्ही तलाठी प्रशिक्षणार्थी म्हणून सेवारत आहेत. विवाहित राहुल 2023 मध्ये तर निकिता ही 2024 मध्ये तलाठी म्हणून रुजू झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर त्यांनी राहुलची पत्नी पूजाला विभक्त करण्याचे ठरवले आणि त्यासाठी छळायला सुरुवात केली होती. या संपूर्ण प्रकाराला कंटाळून पूजाने आत्महत्या केली होती. याप्रकरणी पूजाच्या आईने चाळीसगाव शहर पोलिसात फिर्याद दिली होती.
या फिर्यादीवरुन पोलिसांनी राहुल, निकितासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच राहुल, त्याची आई व भावावर अटकेची कारवाई केली असताना निकिता पसार झाली होती. याबाबतचा संपूर्ण अहवाल हा चाळीसगाव प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना सादर केला होता. या अहवालाच्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही तलाठ्यांना निलंबित केले आहे. तसेच निलंबन काळात राहुल आल्हाट याला मुक्ताईनगर तहसीलदार कार्यालय आणि निकिता जाधव हिला चोपडा तहसील कार्यालयात मुख्यालय देण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘कोणत्याही वाळू माफियांना संरक्षण मिळणार नाही, आठवडाभरात राज्याचं उत्कृष्ट वाळू धोरण जाहीर होणार’