• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video | “आमची महायुती साडेतीन वर्षांपासून, पण आता झालेल्या युत्या…!” ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 24, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Video | “आमची महायुती साडेतीन वर्षांपासून, पण आता झालेल्या युत्या…!” ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

मुंबई, 24 डिसेंबर : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज संयुक्तपणे पत्रकार परिषद घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या युतीबाबत आगामी महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युतीची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिंदेसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधत ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार निशाणा साधलाय.

ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया –

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खरं म्हणजे लोकशाहीमध्ये युती, आघाडी होत राहतात. पण, काही युत्या राज्याच्या आणि जनतेच्या भल्यासाठी होत असतात. गेल्या साडेतीन वर्षांपासून आमची महायुती महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी काम करत आहे. पण आता झालेल्या युत्या या सत्तेसाठी, खुर्चीसाठी तसेच आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे.

महायुती महाराष्ट्रात मजबुतीने उभी –

आतापर्यंत तुम्हीच मीडिया दाखवायचे की, कोण कुणाबद्दल काय म्हणायचे हे जरा बघा. युती कुणाची कुणाशी झाली, तरी आमची महायुती महाराष्ट्रात मजबुतीने उभी आहे. आम्ही लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक महायुतीने जिंकलो. नगर परिषद निवडणुकांमध्ये मविआच्या सगळ्या पक्षांच्या जितक्या जागा आल्या त्यापेक्षा जास्त आमच्या एकट्या शिवसेनेच्या आल्या आहेत. त्यामुळे अशा युत्या या सत्तेसाठी, स्वार्थासाठी आणि आपले अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याचा टोला एकनाथ शिंदेंनी लगावलाय. मुंबईकर मुंबईच्या बाहेर का फेकला गेला? विकासाचे प्रकल्प कुणी अडवले?”, असे सवाल देखील एकनाथ शिंदेंनी उपस्थित केले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


मुंबईकरांना पुन्हा मुंबईत आणणार –

मुंबईबाहेर फेकला गेलेला मुंबईकर, बदलापूर, अंबरनाथ, वांगणी, वसई, विरार नालासोपारापर्यंत गेलेल्या मुंबईकराला पुन्हा मुंबईत आणण्याचे काम आम्ही करणार आहोत. यासाठी, आम्ही क्लस्टर योजना घेतला आहे. पुनर्विकासाचा प्रकल्प घेतला. कारण, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते. दरम्यान, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, 40 लाख लोकांना मोफत घरे देणार. मात्र, इतके वर्ष काय प्रयत्न केले? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याला चालना दिली असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ठ केले.

शिंदेंची ठाकरे बंधूंवर जोरदार टीका –

शिंदे यांनी ठाकरे बंधूंवर अतिशय तीव्र टोला लगावला, जे आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, ते राज्य किंवा मुंबई कशी सांभाळणार? असा सवाल करत कोरोना काळात फक्त पैसा खाल्ला. जेव्हा निवडणुका येतात, तेव्हाच हे ‘मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार’ असा बोर्ड लावतात. मात्र, मुंबईकर सुज्ञ आहेत, त्यांना विकास हवा असल्याचेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.


हेही वाचा : 💥 Video | “फक्त मतांकरता भगवी शाल पांघरून फिरणारे आम्ही नाही…!”, नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरेंवर प्रहार

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindemarathi newsmnsraj thackerayshivsenasuvarna khandesh livethackeray brothers allianceuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

उष्णता लाटेच्या आपत्तीला सामोरे जाण्यासाठी राज्य शासन सज्ज – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page