• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भुसावळ

राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भुसावळातून विरोधकांवर हल्लाबोल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 7, 2024
in भुसावळ, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भुसावळातून विरोधकांवर हल्लाबोल

भुसावळ (जळगाव), 7 मे : रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीरसभेचे भुसावळात आयोजन करण्यात आले. दरम्यान, या सभेत देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीतील नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?-

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीरसभेत बोलताना म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वात 24 पक्षांची खिचडी असून त्यांच्या इंजिनला वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लागले आहेत. मात्र, आपल्या इंजिनला विकासाची डब्बे असून आपली विकासाची गाडी सगळ्यांना सोबत घेऊन चालत आहे. दुसरीकडे त्यांचे फक्त इंजिन आहे आणि प्रत्येक जण त्यावर दावा करतो. त्याठिकाणी डब्बेच नाही. इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा नसते. यांचे इंजिन असे आहे की, तिथे सर्वसामान्यांना बसायला जागा नाहीये. मात्र, मी तुम्ही जर रक्षा ताईंना मतदान केले तर रक्षा खडसे यांचा डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल. आणि विकासाच्या डब्ब्यात सर्वासामान्यांना बसता येईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, देशाचा नेता निवडण्याची ही निवडणूक आहे. कोण देशाला विकासाकडे नेऊ शकते, ही समजण्याची ही निवडणूक आहे. सामान्यांची इच्छा, अपेक्षा आणि आकांक्षा नेमका कोण पुर्ण करू शकतो. यासाठी ही निवडणूक आहे. रक्षा खडसे यांना निवडून आणायचे तर आहेच मात्र, विकास पुरूष पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा सत्तेत आणण्यासाठी ही निवडणूक आहे.

कोट्यावधी नागरिकांना लाभ –

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासकामाबाबत माहिती दिली. घरकुल योजना, शुद्ध पिण्याचे पाणी, मोफत धान्य, गॅस सिलेंडर, मुद्रा योजना, बचत गट यासाठी असलेल्या योजनांचा लाभ देशातील कोट्यवधी नागरिकांना झाला असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच महिलांना देशाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. तसेच 2026 नंतर विधानसभा आणि लोकसभेत 33 टक्के महिला खासदार-आमदार असतील, असेही फडणवीस यांनी सांगितले.

मंत्री गिरीश महाजन काय म्हणाले? –

मंत्री गिरीश महाजन बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरक्षेच्या बाबतीत खुप पॉवरफुल बनवले असून कुठलाही देश आपल्याकडे वाईट नजरेने बघू शकत नाही आणि विविध शस्त्राची निर्मिती आज भारत करू लागला असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या स्थितीत अमेरिकेसारखा देश पंतप्रधान मोदींना पायघड्या घालत आहेत. हा संपूर्ण बदल मागच्या दहा वर्षात घडून आल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा : प्रवाहाच्या विरोधात पोहत जाऊन सत्ता आणण्यासाठी ‘ते’ शिवसेनेत, उन्मेश पाटील-करण पवार यांच्याबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawalbjpcongressdcm devendra fadnvisnarendra modirahul gandhiraksha khadse

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

इंद्रायणी पुल दुर्घटना; चार जणांचा मृत्यू, 51 जणांना वाचविण्यात यश, नेमकं काय घडलं?

June 16, 2025
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरचा अपघात; सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, महाराष्ट्रातील तिघांचा समावेश | नेमकं काय घडलं?

June 15, 2025
“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

“…..यामुळे आमच्या पक्षात येणाचा ओढा वाढतोय”, वाढत्या भाजप प्रवेशावर मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य

June 15, 2025
Rain Update : राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

Rain Update : राज्यात पुढील 24 तासात मुसळधार पाऊस; जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज नेमका काय?

June 15, 2025
Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

Pachora News : धक्कादायक! पाचोरा तालुक्यातील तरूण शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू, नेमकं काय घडलं?

June 14, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page