• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘त्यांची अवस्था ना घर का ना…’, नाव न घेता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 23, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
eknath-shinde-criticize-uddhav-thackeray-on-the-occassion-of-balasaheb-thackeray-jayanti-know-in-detail

'त्यांची अवस्था ना घर का ना...', नाव न घेता एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

मुंबई – बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, त्यांची आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे, या शब्दात उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची जयंती आहे. या निमित्ताने आयोजित जाहीर मेळाव्यात बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे –

शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार, पदाधिकारी, शिवसैनिकांना संबोधित करताना आपल्या भाषणात एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार, दिघेसाहेबांची शिकवण आणि शिवसेना हा चार अक्षरी मंत्र हेच आपले गॉडफादर आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली आहे, बघा. परवाच रामदास भाईंनी मुलाखतीत सांगितलं, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे.

ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची आहे. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, या सगळ्यांनी निकाल दिला. निकाल दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली. धनुष्यबाण आपल्याकडे आला. शिवसेना वाचवण्याचं, धनुष्यबाण वाचवण्याचं काम तुम्ही केलंय, असं शिवसैनिकांना संबोधून ते म्हणाले.

म्हणे, जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ. पण जनतेनेही त्यांचा उरला सुरला त्यांचा नक्षा उतरवून टाकला याचेही साक्षीदार आपण आहोत. शिवेसना वेगाने पुढे जात आहे.

आता म्हणाले, आता आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार, स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि याठिकाणी जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते. घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडा संभालते, असं म्हणून निवडणुका जिंकता येत नाही आणि कार्यकर्त्यांची मनंही जिंकता येत नाही. त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरुन काम करावं लागतं, फिल्डवर उतरुन कार्य करावं लागतं. त्यांच्या सुखदुखात समरस व्हावं लागतं. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांची जयंती आहे.

स्मारकात गेल्यावर ते म्हणाले, बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, त्यांना आम्ही बोलवणार नाही. पण खरं म्हणजे, जे बाळासाहेबांच्या विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. कारण बाळासाहेबांचे विचार सोडण्याचे पाप तुम्ही 2019 मध्ये केलं. म्हणून त्यांनी बाळासाहेबांच्या स्मारकावर जाण्यापूर्वी त्यांनी नाक घासून माफी मागायला हवी होती. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायी तुडवले, त्यांच्याबद्दल काय अपेक्षा ठेवणार, या शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

हेही वाचा – जळगाव रेल्वे अपघात : 13 जणांचा मृत्यू, 12 जणांची ओळख पटली, संपूर्ण यादी…

बातमी शेअर करा !
Share
Tags: balasaheb thackerayeknath shindemumbaishivsenaShivsena UBTuddhav thackeray

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 16, 2026
‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

September 16, 2026
महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

September 16, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

September 16, 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page