नवी दिल्ली, 8 मे : भारतानं दहशतवाद्यांचे तळे नेस्तानाबूत करत ऑपरेशन यशस्वी केल्यानंतर पाकिस्तान हादरला. मात्र, पुन्हा एकदा पाकिस्तानाच्या कुरापती वाढल्या असून आज पाकिस्तानकडून जम्मू, राजस्थान तसेच पंजाबमध्ये ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. परिणामी, भारतानं पाकिस्तानचे सर्व ड्रोन हल्ले आकाशातूनच परातवून लावले आहेत.
पाकिस्तानचे जम्मूमध्ये ड्रोन हल्ले –
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला हादरा बसला. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना पाकिस्तान काहीतरी घडवून आणणार याची देखील शक्यता व्यक्त केली जात असताना आज रात्री भारताच्या हद्दीतील जम्मू शहरात पाकिस्तानकडून ड्रोनचा हल्ला करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआऊट करण्यात आले. यावेळी सायरन वाजवून लोकांना सावध करत या प्रदेशाचा ताबा लष्कराने घेतला.
पाकच्या कुरापतींना भारताचं प्रत्युत्तर –
पाकिस्ताने जम्मू, पंजाब तसेच राजस्थान या राज्यांना लक्ष्य केले. दरम्यान, पाकिस्तानच्या ड्रोन हल्लानंतर भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केले. दरम्यान, पाकिस्तानला प्रत्युत्तर म्हणून भारताने देखील लाहोरमध्ये ब्लॅकआऊट केलंय. पाकच्या लाहोरवर ड्रोन हल्ला तसेच मिसाईल हल्ला सुरू केल्याची ताजी माहिती समोर आली आहे.