जळगाव, 22 फेब्रुवारी : आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते की, जे माझ्यासोबत आले त्यांना निवडणुकीत पराभूत होऊ देणार नाही. आणि त्यांनी तसेच करून दाखवले. म्हणून एकनाथ शिंदे यांना कोणीही हलक्यात घेऊ नये, असा इशारा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.
गुलाबराव पाटील काय म्हणाले? –
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि विधानसभेत अजित दादा-देवेंद्रजींच्या साक्षीने सांगितले होते की, माझ्यासोबत जे आलेले आहेत, त्यांना या निवडणुकीत तसेच पुढच्या निवडणुकीत पराभूत होऊ देणार नाही, अशापद्धतीचे काम करून दाखवेन. आणि महायुतीत आम्ही दोनशेच्या पार जागा निवडून आणून दाखवू.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत दाखवून दिले की, 80 जागा लढवूनही आम्ही 60 जागा जिंकू शकतो. तसेच आम्ही तिघं (देवेंद्र-फडणवीस-एकनाथ शिंदे-अजित पवार) जण मिळून सरकार आणू शकतो, अशापद्धतीचे चित्र त्यांनी या ठिकाणी निर्माण केलंय. त्यामुळे त्यांना कोणीही हलक्यात घेऊ नका, अशा इशारा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला आहे.