हिंदी भाषा ही तिसरी भाषा म्हणून सक्तीने शिकवण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय आणि त्या निर्णयाला राज्यभरात झालेला प्रचंड विरोध! यावरून मराठी भाषेचं अस्तित्व आणि अस्मितेबद्दल अनेक चर्चांना सुरूवात झाली आहे. अनेक मान्यवर त्यावर आपापली मतं व्यक्त करत आहेत. या संपूर्ण विषयावर सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने आंतरराष्ट्रीय किर्तीचे भाषातज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी अत्यंत परखडपणे आपली महत्त्वाची अशी मतं व्यक्त केली.