• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा; सुप्रिम कोर्टाचे राज्य सरकारला नेमके आदेश काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 6, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा; सुप्रिम कोर्टाचे राज्य सरकारला नेमके आदेश काय?

नवी दिल्ली, 6 एप्रिल : गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत होत्या. असे असताना प्रशासकराज अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरू होता. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्वपुर्ण आदेश दिले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्या, असा महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सुनावणीत नेमकं काय घडलं? –
महाराष्ट्रातील पंचायत निवडणुकीतील ओबीसी आरक्षण प्रकरणावर न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठाने सुनावणी केली. यावेळी सूर्यकांत म्हणाले की, देशात आरक्षण हे रेल्वेच्या डब्यासारखे झाले असून जे लोक त्यात चढले आहेत, ते दुसऱ्यांना आत येऊ द्यायला तयार नाहीत.

दरम्यान, याचिकाकर्त्यांतर्फे इंदिरा जयसिंह यांनी सुप्रीम कोर्टाकडे महाराष्ट्रात पंचायत निवडणुका घेण्याची मागणी केली. तसेच इंदिरा जयसिंह म्हणाल्या की, निवडून आलेल्या स्थानिक संस्था अस्तित्वात नसून त्यांच्या जागी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी फक्त काही विशिष्ट वर्गांनाच आरक्षण का मिळावे? सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या मागासलेल्या इतर लोकांना आरक्षण का मिळू नये असा प्रश्न करत यावर विचार करणे ही राज्यांची जबाबदारी आहे, असल्याचे न्या. सूर्यकांत म्हणाले.


सुप्रिम कोर्टाचे राज्य सरकारला नेमके आदेश काय? –

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अडवून ठेवण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही.
  • 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती, त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घ्या.
  • ओबीसींच्या जागा कमी होत्या, हा याचिकाकर्त्यांचा दावा होता, त्यावर कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले.
  • स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकांबाबत चार आठवड्यात अधिसूचना काढावी.
  • राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यांत घ्याव्यात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा –
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्यापर्यंत राज्यातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे, जवळपास पाच वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-पुण्यासह विविध महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पंचायत निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : जळगावमध्ये 250 कोटींचे विभागीय क्रीडा संकुल तर ग्रामीण भागासाठी 14 लाखांचे क्रिडांगण अनुदान, नेमकी बातमी काय?

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: local body electionsmarathi newsobc reservationsupreme courtsuvarna khandesh live

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी – आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

    नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सेवांची प्रभावी अंमलबजावणी करावी – आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

    November 13, 2025
    समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    November 13, 2025
    अमळनेर पोलिसांची यशस्वी मोहीम; चोरीच्या 24 दुचाकी हस्तगत, दोन संशयित जेरबंद

    अमळनेर पोलिसांची यशस्वी मोहीम; चोरीच्या 24 दुचाकी हस्तगत, दोन संशयित जेरबंद

    November 13, 2025
    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य कार्यशाळा संपन्न

    कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्य कार्यशाळा संपन्न

    November 13, 2025
    भडगावची जनता विकासाच्या पाठीशी; नगरपरिषदेत शिवसेनेचाच झेंडा फडकेल – आमदार किशोर आप्पा पाटील

    भडगावची जनता विकासाच्या पाठीशी; नगरपरिषदेत शिवसेनेचाच झेंडा फडकेल – आमदार किशोर आप्पा पाटील

    November 12, 2025
    Video | “ते जेवढे अडथळे आणतील तेवढी ताकदी माझ्यात येईल!”, 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

    Video | “ते जेवढे अडथळे आणतील तेवढी ताकदी माझ्यात येईल!”, 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर उन्मेश पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

    November 12, 2025
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page