• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

“….तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते”, पुण्यात गृहमंत्री अमित शहा नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 21, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
“….तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते”, पुण्यात गृहमंत्री अमित शहा नेमकं काय म्हणाले?

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

पुणे, 21 जुलै : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला जोरदार धक्का बसला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापासून भाजपने रणनिती आखायला सुरूवात केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनितीचाच एक भाग म्हणून पुण्यातील बालेवाडी येथे आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिवेशन घेण्यात आले. दरम्यान, या अधिवेशनात हजारो कार्यकर्त्यांना संबोधित करत गृहमंत्री शहा यांनी जोरदार भाषण केले.

काय म्हणाले अमित शहा? –
पुण्यातील अधिवेशनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत. राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केल्या आहेत. आम्ही 2014 साली आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर मराठ्यांना आरक्षण दिले. सरकार कुणाचे आले आणि आरक्षण गेले? मात्र, आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले.

“….तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते” –
आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हवे. यांची (विरोधकांची) सत्ता आली तर आरक्षण गायब होईल. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचे सरकार येते, तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळते. शरद पवारांची सत्ता आल्यानंतर ते आरक्षण जाते, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

पुढचे 30 वर्ष भाजपचे सरकार –
लोकसभा निवडणुकीची सर्व कसर आता राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भरून काढा. आगामी निवडणुकीमध्ये मोठे यश मिळेल आणि राज्यात प्रंचड बहुमतात युतीचे सरकार येईल, असा विश्वास गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी व्यक्त केला आहे. दरम्यान, आता फक्त 10 वर्षे पुर्ण झाली आहेत आणि पुढचे 30 वर्ष भाजपचे सरकार या देशात येईल. आपल्यातील आत्मविश्वासाला जागरूक करण्याची गरज असून आपल्यातील मतभेद दूर करण्याची गरज आहे. महान भारताची रचना ही केवळ भाजपचं करू शकते आणि याच आत्मविश्वासासह पुढे जायचे आहे, असा निर्धार त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केला.

पाच हजारांहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित –
पुण्यात आयोजित केलेल्या या अधिवेशनाची ‘संघटन हीच शक्ती मनामनात राष्ट्रभक्ती’ ही टॅगलाईन आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी आपले संघटन मजबूत करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे, असल्याचे अधिवेशनातून स्पष्ट होत आहे. अधिवेशनाला शहा यांच्यासोबतच राष्ट्रीय आणि राज्यातले प्रमुख नेते उपस्थित होते. येत्या विधानसभा निवडणुकीची दिशा आणि रणनिती यावर अधिवेशनात शहा यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, अधिवेशनाला राज्यातून पाच हजारहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहिले.

हेही पाहा : Special Interview : ‘त्या’ शाळांना आरटीईची प्रक्रिया राबवावीच लागेल – अ‍ॅड. दीपक चटप यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: Amit Shahamit shah latest newsamit shah pune visitbjppuneunion home minister amit shah

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page