नवी दिल्ली, 3 एप्रिल : केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी) संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केले. त्यांनंतर काल दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली. दरम्यान, या चर्चेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. हा संसदेचा कायदा असून सर्वांना तो स्वीकारावाच लागेल, असे केंद्रीय मंत्री शहा यावेळी म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शहा काय म्हणाले? –
लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, वक्फ म्हणजे धर्मादाय आणि यात व्यक्ती धार्मिक कार्यासाठी दान करते. दान त्याच गोष्टीचे करता येत असते जी आपली आहे. तसेच मी सरकारी किंवा दुसऱ्याच्या मालकीची संपत्ती दान करू शकत नाही. दरम्यान, विरोधकांनी वक्फ विधेयकाला विरोध दर्शवल्याने अमित शहा विरोधकांवर संतापल्याचे पाहायला मिळाले. संसदेने बनवलेला हा कायदा सर्वानांच मान्य करावाच लागेल, असे ते यावेळी म्हणाले.
वक्फ विधेयकावरून विरोधकांवर हल्लाबोल –
एका सदस्याने सांगितले की, अल्पसंख्यांक ह्या कायद्याचा स्वीकार करणार नाही असा आरोप करत अमित शहा पुढे म्हणाले की, हा संसदेचा कायदा असून तो सर्वांना स्वीकारवाच लागेल. हा कायदा भारत सरकारचा असून तो सर्वांसाठी बंधनकारक आहे आणि त्याचा सर्वांना स्वीकार करावाच लागेल.
वक्फ विधेयक संसदेत मंजूर –
केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी काल (बुधवारी) संसदेत वक्फ दुरूस्ती विधेयक सादर केलं. यानंतर काल दुपारी 12 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत 2 ते 3 वाजेपर्यंत या विधेयकावर चर्चा झाली. आणि त्यानंतर मध्यरात्री झालेल्या मतदानानंतर वक्फ दुरूस्ती विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले. यावेळी या विधेयकाच्या बाजूने 288 मते पडली. तर विरोधात 232 मते पडली आहेत. दरम्यान, या विधेयकाच्या चर्चे दरम्यान सत्ता पक्षांच्या खासदारांनी विधेयकाचे समर्थन केले तर विरोधी पक्षांच्या खासदारांन याला कडाडून विरोध केला आहे.
हेही पाहा : JMFC Results : शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश बनला पाचोरा तालुक्यातील पहिला न्यायाधीश | Success Story