अक्कलकुवा, 17 फेब्रुवारी : राज्यात दहावी-बारावीच्या परिक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात अभ्यासाचे नियोजन केले जात असताना अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथे पालक मेळावा तसेच दहावी,बारावीचा निरोप समारंभ पार पडला.
काय आहे संपूर्ण बातमी? –
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी येथील श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ अक्कलकुवा संचालित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोलगी येथे आज, 16 फेब्रुवारी रोजी पालक मेळावा तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात युवासेनेचे अक्कलकुवा तालुकाप्रमुख जयवंत पाडवी यांनी इयत्ता10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या पुढील करिअर व आजच्या स्पर्धेच्या युगाला कसे सामोरे जायचे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यात कॉपी मुक्त परीक्षा कशी राबवता येईल, याविषयी जयवंत पाडवी यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, यावेळी विविध खेळात उत्तम कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांच्या सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
हेही वाचा : ‘मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी’, महाअधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?