• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 20, 2026
in महाराष्ट्र, खान्देश, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान; रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

जळगाव, 20 मार्च: “शेतकरी हा अन्नदाता असून देवासमान आहे. रासायनिक खतांचा अतिरेक थांबवून नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केले. अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ या राष्ट्रीय अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

देशातील शेतीजमीन सुपीक राहावी, रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा आणि शाश्वत शेतीला चालना मिळावी या उद्देशाने अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ,आमदार अनिल  पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्यासह विविध मान्यवर, सामाजिक व धार्मिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुढे सांगितले की, रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत असून त्याचा परिणाम मानवी आरोग्यावरही होत आहे. योग्य पद्धतीने नैसर्गिक शेती केल्यास उत्पादनात घट होत नाही, उलट जमिनीची गुणवत्ता सुधारते. “धरती माता वाचवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांनी किमान काही क्षेत्रावर नैसर्गिक शेतीचे प्रयोग करावेत, असे आवाहन केले.

शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक – मंत्री गिरीश महाजन

मंत्री गिरीश महाजन म्हणाले, आपण जमिनीला केवळ उत्पादन देणारे साधन समजतो; मात्र तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. वाढत्या रासायनिक खत व कीटकनाशकांच्या वापरामुळे अन्नातून शरीरात जाणाऱ्या रसायनांमुळे गंभीर आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मातीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक – पालकमंत्री गुलाबराव पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भारत हा जगात एकमेव देश आहे जो भूमीला ‘माता’ मानतो. मात्र, आपणच तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत. रासायनिक खत व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मातीची सुपीकता आणि अन्नाची गुणवत्ता धोक्यात येत असून त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत आहे. त्यामुळे शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

अमळनेर येथे ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ राष्ट्रीय अभियानाचा उत्साहात शुभारंभ –

देशातील शेतीजमीन रासायनिक खतांच्या वापरामुळे निकस होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर कृषी व पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांनी सन २०२१ पासून ‘भूमी सुपोषण व संवर्धन’ हे राष्ट्रव्यापी जनअभियान सुरू केले आहे. गेल्या पाच वर्षांत देशभरातील सुमारे ३० हजार गावे व ५४ हजार शहरी भागांत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ अमळनेर येथे करण्यात आला. या अभियानाचा कालावधी १९ मार्च २०२६ ते अक्षयतृतीया १९ एप्रिल २०२६ पर्यंत राहणार असून या कालावधीत देशभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. अक्षय कृषी परिवाराचे उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांनी भूमी सुपोषण व संवर्धन अभियानाची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगळ ग्रह संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘धरती माता संरक्षण’ करण्याचा संकल्प घेत अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा: राज्यातील शालेय पोषण आहार पुरवठ्यातील तक्रारींची सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: amalner newsfarmer newsnational campaignshivraj singh chouhansoil enrichment and conservationsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणात मंत्री गिरीश महाजनांच्या नातेवाईकाला अटक; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

August 13, 2026
सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

August 13, 2026
भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 13, 2026
लाखोंची घंटागाडी धुळखात अन् घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; लासगावात ग्रामस्थ संतप्त

लाखोंची घंटागाडी धुळखात अन् घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर; लासगावात ग्रामस्थ संतप्त

August 12, 2026
घाटकोपरमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा सहावर, बचावकार्य सुरू

घाटकोपरमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा सहावर, बचावकार्य सुरू

August 12, 2026
गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

गडचिरोलीतील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश

August 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page