• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“……अन्यथा थेट आत्मदहन,” मन्याड धरणाबाबतच्या प्रलंबित मागण्यावरून प्रशासनाला इशारा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 3, 2024
in जळगाव जिल्हा, चाळीसगाव, ताज्या बातम्या
“……अन्यथा थेट आत्मदहन,” मन्याड धरणाबाबतच्या प्रलंबित मागण्यावरून प्रशासनाला इशारा

जळगाव, 3 ऑगस्ट : मन्याड धरणाबाबतच्या मागण्यांसाठी वारंवार निवदेन तसेच आमरण उपोषण करूनही त्या मागण्या पुर्ण होत नसल्याने शेतकरी संघटनेचे दिलीप पाटील यांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने येत्या 14 ऑगस्ट 2024 पर्यंत मन्याड धरणाबाबतच्या प्रलंबित असलेल्या मागण्या पुर्ण कराव्यात, अन्यथा मी 15 ऑगस्ट रोजी चाळीसगाव येथील तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिलीप पाटील यांनी दिला आहे.

निवदेनात काय म्हटलंय? –
दिलीप पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला टपालद्वारे दिलेल्या निवदेनात नमूद केल्यानुसार, गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून मन्याड धरणात पाणी टाकणे, गिरणा धरण, पावसाळयात फुल भरल्यानंतर ओव्हर फ्लो होणारे पाणी मन्याड धरणात टाकणे, रोटेशन पध्दतीने पाणी मन्याड धरण्यात टाकण्यात यावे, मन्याड धरणाची उंची वाढवणे, यासह अनेक मागण्यांसाठी 7 मार्च 2024 पासून 10 दिवसांचे आमरण उपोषण केले होते.

मागण्या पुर्ण न होत असल्याने आत्मदहनाचा इशारा –
दरम्यान, त्यावेळी जलसंपदा विभागातील अधिका-यांनी मागण्याबाबत आश्वासन दिले होते, पण खुप दिवस होवूनही मागण्यांबाबत कुठलीही पुर्तता झालेली नाही. हे पाहता वरील मागण्यासाठी आता आत्मदहन हाच एक पर्याय उरला आहे. स्वातंत्र्यानंतर 77 वर्षे होत आली आहेत, स्वातंत्र्य मिळूनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय हि खेदाची बाब आहे. आमच्या मागण्या 14 ऑगस्ट 2024 दुपारी 1 प्रर्यंत पुर्ण कराव्या, अन्यथा मी येणा-या 15 ऑगस्ट 2024 रोजी चाळीसगांव येथील तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा दिलीप पाटील यांनी दिला आहे. निवेदनावर दिलीप पाटील यांच्यासह अखिलेश पाटील, खुशाल सोनवणे, रामकृष्ण महाजन, सईद देशमुख, भिमराव जाधव, आदींच्या सह्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी निवदेन स्विकारले नाही? –
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवदेन देण्यासाठी आलेल्या दिलीप पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला गेलो असता त्यांनी आमचे निवदेन स्विकारले नाही. कारण आत्मदहन हा शब्द निवदेनातून काढा आणि चर्चा करा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. मी आत्महत्या आणि आत्मदहन करण्याचा इशारा देणाऱ्यांचे निवदेन स्विकारत नसतो, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले. दरम्यान, मागण्या जर पुर्ण होत नसतील तर आत्महदहन करण्याचा इशारा देणे, हे काही गुन्हा आहे अर्थात मग भारतात लोकशाही आहे का? असा संतप्त सवाल दिलीप पाटील यांनी उपस्थित केला.

मन्याड धरणाच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे –

  • गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून मन्याड धरणात पाणी टाकणे.
  • गिरणा धरण पावसाळ्यात फुल झाल्यावर ओव्हर फ्लो होणारे पाणी मन्याड धरणात टाकणे.
  • मन्याड धरणाची उंची वाढवणे.
  • कॅनॉलची दुरुस्ती करणे.

हेही वाचा : 11 महिन्यांचा असताना वडिलांचं निधन, मामाकडे राहून शिकला अन् पारोळ्याचा प्रफुल झाला PSI, प्रेरणादायी स्टोरी

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadjalgaon newsmanyad damsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

युद्धपरिस्थितीचा परिणाम; अडकलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने उचलली मोठी पावले, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

March 4, 2026
इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

इराण-इस्रायल युद्ध; भारताकडे किती दिवसांचा इंधन साठा शिल्लक?, केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

March 4, 2026
जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page