मुंबई – शिंदे गटामध्ये उदय होणार आहे. मला कुणाची नावे घ्यायची नाही. पण ज्यापद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीने अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला पक्ष तोडण्याची ही चटक लागली आहे, या शब्दात ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
देशभरात चंद्राबाबू, नितीशकुमार यांचाही पक्ष तोडला जाईल. यांच्या जिभेला रक्त लागले आहे. जोपर्यंत ही चटक आहे, तोपर्यंत हे फोडाफोडीचे राजकारण चालू राहील, असेही संजय राऊत म्हणाले.
हिंजवडीमधील चित्र विदारक –
हिंजवडी किंवा पुण्यातील जो भाग आहे, हा महाराष्ट्रात एक आयटी हब आहे. आयटी क्षेत्रात आपण प्रगती केली आहे, असं जे सांगितले जाते, पण महाराष्ट्रासह देशातली बेरोजगारी कशी रस्त्यावर दिसते आहे, ते कालचे चित्र होतं. काही मोजक्या जागांसाठी आयटी क्षेत्रातील इंजीनिअर 5 हजारांपेक्षा जास्त रांगेत उभे होते. हे अत्यंत विदारक चित्र होतं. ठिकठिकाणी हेच चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे. ही आपल्या देशाची आजची परिस्थिती आहे.
या क्षेत्रात हजारो तरुण बेरोजगार आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दावोसमधून इथे परकीय गुंतवणूक आणताहेत, रोजगार वाढवण्यासाठी, उद्योग वाढवण्यासाठी. आज राज्यातील परिस्थिती काय आहे, या संदर्भात तुम्ही श्वेतपत्रिका काढली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी सरकारला केले.
भाजपला पक्ष फोडण्याची चटक –
ज्यापद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मूळ शिवसेना तोडण्यात आली. त्याच पद्धतीने अजित पवारांचा आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष तोडला जाईल. भारतीय जनता पक्षाला पक्ष तोडण्याची ही चटक लागली आहे, या शब्दात ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.
हेही वाचा – एसटीची भाडेवाढ अन् शिवसेना ठाकरे गट आक्रमक; आज करणार चक्काजाम आंदोलन, नेमकी काय बातमी?