• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

“80 वेळा घटना बदलवण्याचे पाप काँग्रेसने केले,” जळगावातून मंत्री नितीन गडकरी यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 11, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, देश-विदेश, ब्रेकिंग, महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जळगावातील सभेत बोलताना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जळगावातील सभेत बोलताना

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 10 मे : आम्ही संविधान तर बदलवणार नाहीच, पण 80 वेळा ही घटना तोडण्याचे पाप हे कुणीजरी केले असेल तर हे काँग्रेसेने केले आहे. याचे त्यांनी उत्तर द्यावे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जळगावातील जाहीरसभेत बोलत होते.

काय म्हणाले मंत्री नितीन गडकरी? –
केशवानंद भारती यांच्या सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचा दाखला देत मंत्री गडकरी म्हणाले की, सुप्रिम कोर्टात केस आली होती. त्यांनी आपल्या देशाच्या घटनेचे मुलभूत तत्व कुठल्याही सरकारला किंवा राष्ट्रपती वा पंतप्रधानांना ते बदलाता येऊ शकत नाही. पण घटनेचा ब भाग जो त्याला बदलता येतो. मला तुम्हाला सांगताना दुःख होत आहे की, आम्ही तर संविधान तर बदलवणार नाहीच, पण मात्र, 80 वेळा घटना बदलवण्याचे काम काँग्रेसने केले आहे.

विरोधकांकडून आमचा अपप्रचार –
मंत्री गडकरी पुढे म्हणाले की, मुस्लिम समाजातील बांधवांपर्यंत विरोधकांकडून चुकीचा प्रचार केला जात आहे. ते त्यांना सांगतात की तुम्हाला कापून टाकतील, तुम्हाला पाकिस्तानाला पाठवून देतील. अशावेळी आमच्या सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवित असताना कुणालाही सरकारच्या योजनांपासून वंचित ठेवले नाही, कारण आमचे ध्येयच आहे की, सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास. आम्ही सगळ्या योजना सगळ्यांकरिता केल्या. कुठलाही माणूस गरीब गरीब असतो, तो कुठल्याही जात वा धर्माचा याठिकाणी संबंध नसतो. असे असताना मात्र विरोधकांकडून आमचा अपप्रचार केला जात असल्याचे मंत्री गडकरी म्हणाले.

स्मिता वाघ यांच्यात लोकांचे प्रश्न मांडण्याची ताकद –
देशाचे भविष्य आणि भवितव्य ठरवणारी निवडणूक ही निवडणूक आहे. तुमचा भविष्यकाळ चांगला करायचा असेल. शेतकऱ्यांना समृद्ध, सिंचनासाठीच्या योजना, बेरोजगारी तसेच गरिबी यावर यशस्वीपणे काम करायचे असेल तर यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार. नाहीतर मग धोकाच आहे, असे मंत्री गडकरी म्हणाले. तसेच स्मिता वाघ यांच्यात लोकांचे प्रश्न मांडण्याची ताकद आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले.

समाज बदलणे आमचे स्वप्न –
सगळ्यांनी गरीबी हटावचा नारा दिला आज अशी परिस्थिती आहे की, 75 वर्षांच्या या स्वाधीनतेच्या इतिहासात साठ वर्ष मिळून काँग्रेस जे काम करू शकले नाही ते मागील दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वात आमच्या सरकराने करून दाखवल ते तुमच्यासमोर आहे. केवळ मंत्री, आमदार किंवा खासदार बनणे आमचे स्वप्न नाहीये तर समाज बदलणे आमचे स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, अरविंद देशमुख यांच्या महायुतीतील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींची शरद पवारांना खुली ऑफर! नंदुरबारातील सभेत नेमकं काय म्हणाले? 

बातमी शेअर करा !
Share
Tags: congressminister nitin gadkarinitin gadkari criticsnitin gadkari jalgaon sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

Pachora Taluka News: पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत वृक्षारोपण

September 17, 2026
जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान;  लोकचळवळ म्हणून अभियान राबवा: ZP CEO करिश्मा नायर यांचे आवाहन

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

सेवा संकल्प अभियानाच्या चित्ररथाचा शुभारंभ; जिल्हाधिकारी कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून अभियानास सुरुवात

September 17, 2026
“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

“….तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार!” मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन स्थगित; सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

September 17, 2026
सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सेवा संकल्प अभियानातून वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

September 17, 2026
‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page